भोजनातील हानिकारक संयोग
- दुधासोबत- दही , मीठ , आंबट वस्तू, चिंच, डांगर , मुळा , पाने, दोडकी , बेल, आंबट फळे, सातू, हानिकारक असतात. दुधात गुळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दूधा सोबत हानिकारक आहेत.
- दह्या सोबत- खीर, पनीर , दूध, गरम जेवण , केळी , डांगर (खरबूज ), मुळा इत्यादी घेऊ नये.
- तुपासोबत - थंड दूध, थंड पाणी व सम प्रमाणात मद्य हानिकारक असते.
- मद्या सोबत- मुळा , खरबूज , सम प्रमाणात तूप , द्राक्षे , पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
- फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते.
- मुळ्यासोबत- गूळ खाणे नुकसानदायक असते.
- खिरी सोबत - खिचडी , आंबट पदार्थ, फणस व सातू घेऊ नये.
- गरम पाण्याबरोबर - मद्य घेऊ नये.
- थंड पाण्या बरोबर - शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभुळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये.
- कलिंगडा बरोबर- पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये.
- चहा सोबत -काकडी , थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
- माशा सोबत- दूध , उसाचा रस, मध , पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
- मांसा बरोबर- मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
- गरम जेवणा बरोबर - थंड जेवण व थंड पेय हानिकारक असतात.
- खरबूजा बरोबर- लसूण, मुळा ,मुळ्याची पाने , दुध किंवा दही नुकसानकारक असते.
- तांबे पितळ किंवा कांशाच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप ,तेल , दही , ताक , लोणी, रसदार भाज्या ईत्यादी विषाक्त होतात. अशा भांड्यांत बराच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत.एल्यूमिनिम आणि प्लास्टिक च्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवण्याने , उकळल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

No comments:
Post a Comment